दि.०५ऑगस्ट २०२६ या दिवशी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या भात प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत येथे भेट दिली.
आधुनिक कृषी संशोधन, भात शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सुरू असलेले उपक्रम पाहून खूप प्रेरणा मिळाली.
…









शेती आणि शहरे यांच्या विकासात संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान, आधुनिक संशोधनाला प्रोत्साहन आणि भावी पिढीमध्ये शेतीविषयी संवेदनशीलता निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
यावेळी उत्कर्ष मंदिर, मालाड येथील विद्यार्थ्यांसोबत भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मातीत हात घालून शेतीचे महत्त्व आणि अन्नदात्याप्रती असलेला आदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा अर्थपूर्ण प्रयत्न ठरला.
शेती आणि शिक्षण समाजाच्या विकासाचे दोन भक्कम आधारस्तंभ. या दोन्हींच्या बळकटीकरणातूनच समृद्ध आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र शक्य आहे.

